गावाविषयी माहिती
ग्रामपंचायत अंभई ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे.सदर ग्रामपंचायत मध्ये अंभई, आमगाव आणि खुटल अशी तीन महसूल गावे समाविष्ट आहेत .
१.अंभई हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक गाव आहे, जेथे प्रामुख्याने वारली बोलीभाषा बोलली जाते, पिनकोड ४२१३०३ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे १३ किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे ७० किमी दूर आहे, हे गाव आदिवासीबहुल असून नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.
२.आमगाव (वाडा) हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे, जेथे २०११ च्या जनगणनेनुसार १३२८ लोकसंख्या आहे आणि ते ५०४.४३ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे; हे गाव उत्तर कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते, असे दिसते.
३. खुटल हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील एक गाव आहे, जे मुख्यत्वे आदिवासी लोकवस्तीचे असून, वाडा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात येते आणि घनदाट जंगल व निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते.
मुख्य माहिती:
सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची लोकसंख्या सुमारे २४७३ आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५ , अंगणवाडी केंद्रे ०८ , शासकीय आश्रमशाळा १, खाजगी संस्थेचे मराठी व इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक विद्यालय १ ,आत्मा मालिक ध्यानपीठ आश्रम तसेच समाजमंदिर-३ अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी ८ हातपंप, ५ विद्युतपंप , ६विहिरी तसेच २ नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत खुटल गावात हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात.
अंभई ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंभई,आमगाव,खुटल.गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
अंभई ग्रामपंचायत आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
अंभई ग्रामपंचायत हि वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे२० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तिन्ही गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ 1439 हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४८८ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २४७३ आहे. त्यामध्ये पुरुष १२६० व महिला १२१३ यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने एका बाजूला डोंगर असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत देहरजा नदी असून ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
ग्रामपंचायत अंभई येथे भात शेती प्रामुख्याने केली जाते.
लोकजीवन
ग्रामपंचायत अंभई..येथील गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात शेती व हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह शेळीपालन काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
ग्रामपंचायत अंभई.च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
ग्रामपंचायत अंभई.गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे मरळगोई बु.गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत गावदेवी मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
हनुमान मंदिर – खुटल गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील मंदिर आहे. तसेच कोहोज किल्ल्यावर जाण्यासाठी आमगाव खिंडीचा पाडा येथून पायवाट सुरु होते.
जवळची गावे
अंभई गाव आमगाव तसेच खुटल गाव वाडा तालुक्यातील पश्चिमेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
आसपासची प्रमुख गावे आहेत.
वाघोटे,हमरापूर,रायसल,कुमदल.